एकविसाव्या शतकातही हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कोणतेही कार्य असो, त्यासाठी मुहूर्त अथवा कुंडलीही पाहिलीच जाते. यासाठी अर्थातच आठवतात गावातील ब्राह्मण, गुरुजी. ज्योतिषशास्त्र हा ब्राह्मण वर्गाचा पारंपरिक अभ्यास असला तरी आज ज्योतिषशास्त्रात विविध धर्म व समाज पारंगत होत ज्योतिष पाहण्यासह विविध मुहूर्त व कुंडली पाहणे त्यांनी सुरू केले आहे. दहिगाव (ता. यावल) येथील मुस्लिम धर्मातील […]
maharashtra News
daily updates
Mumbai : प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली सरकारची फक्त इव्हेंटबाजी ; काँग्रेसची टीका
याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. मुंबई : मुंबई प्रदुषणाच्या बाबतीत आज मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सरकार प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली फक्त इव्हेंटबाजी करीत असल्याची टीका काँगेसने केली आहे. आयआयटीबी व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संस्थेच्या अहवालानुसार, ७१ टक्के प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प आणि विकासकामे यांच्यामुळे होत आहे. याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे […]
Maratha Reservation : ”ज्यांनी जरांगेंसमोर सर..सर… केलं त्यांनाच अध्यक्ष केलं”, सदावर्तेंचा कोर्टात जाण्याचा इशारा
मुंबईः माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीला Adv. गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केलाय. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, आंतरवाली सराटीमध्ये जावून ज्यांनी मनोज जरांगे यांना सर.. सर… केलं, जे कार्यकर्ता स्वरुप म्हणा किंवा भाईचारा स्वरुप म्हणून जरांगेंकडे गेले, […]
Balasaheb Thorat : ”शिवाजी महाराजांची सुरत मोहीम स्वराज्यासाठी होती; पण यांनी…” थोरातांचं गोगावलेंना प्रत्युत्तर
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला होता. नागपूरः शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये आमदार भरत गोगावले यांनी सुरत मोहिमेबद्दल बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला होता. त्यावरुन काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुम्ही सुरतच का निवडलं?’ या […]
Maratha Reservation: २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटणार; मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटलांना विश्वास
नागपूर : सभागृहाच्या कामकाजात मराठा आरक्षणावर विस्तृत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे येत्या २५ डिसेंबरपूर्वी कुणबी-मराठा तिढा सुटेल, असा विश्वास मराठा उपसमितीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना व्यक्त केला. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून वादंग उठले आहे. अशात आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सुटावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात […]
Jalna News : गोळीबारामुळे जालना शहरात पुन्हा दहशत; 5 जणांवर गुन्हा दाखल, 1संशयित ताब्यात
जालना न्यूज : शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून सोमवारी (11) भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारात गजानन तौर यांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत तब्बल 48 खुनाच्या घटना घडल्या आहेत. यापैकी तीन खूनांचा अद्याप तपास […]
RTO: परिवहन विभागात ५०० महत्वाचे पद रिक्त; मोटार वाहन कायद्याकडे दुर्लक्ष
RTO: केंद्रीय मोटार वाहन कायदा प्रभावीपणे राज्यात राबवण्याची जबाबरी राज्याच्या परिवहन विभागाची आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील रस्ते वाहन अपघात आणि मृत्यूची आकडेवारी बघता परिवहन विभाग अंमलबजावणीसाठी गभिर नसल्याचे दिसते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन विभागाचा भार आहे. त्यानंतरही परिवहन विभागाचे अपर परिवहन आयुक्त, सहाय्यक परिवहन आयुक्तांसह राज्यभरातील २३ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे रिक्त पदांमुळे परिवहन […]
Nashik News: उदासीन मालकांना भाडेकरूंच्या नोंदीचे नाही गांभीर्य; शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये 12 हजार नोंदी
Nashik News : शहराचा चोहोबाजूंनी विस्तार होत असून, ग्रामीण भागातून रोज अनेक कुटुंबकबिला शहरात रोजीरोटीसाठी दाखल होत आहे. स्थलांतरितांकडून भाड्याच्या घरात वास्तव्य करताना पोटाची खळगी भरली जाते. ‘स्वमालकीचे घर भाड्याने दिल्यानंतर त्याचा करार करणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे भाडेकरूंविषयक माहिती स्थानिक पोलिस ठाण्यांना कळविणेही महत्त्वाचे असते. परंतु मालकांमध्ये भाडेकरूंच्या नोंदीविषयी गांभीर्य नसल्याचे उदासीन चित्र आकडेवारीतून दिसून येते […]
Maharashtra Politics: महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल राज्य करतायत; ठाकरे गटाच्या नेत्याचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाल्यानंतर राज्यात राजकीय वाद पेटला आहे. भाजपने नवाब मलिक यांना सत्तेत सहभागी करुन घेण्याच्या मुद्द्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र देखील लिहीलं. दरम्यान या मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत […]
Nashik News: सरकारी काम अन सहा महिने थांब..! रिक्त जागांमुळे सरकारी कामकाज अधू, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
Nashik News : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशी म्हण आहे. यास सरकारी व्यक्ती, प्रवृत्तीबरोबरच सरकारी धोरणेदेखील कारणीभूत आहे. सरकारी धोरणात महसुली खर्चाचा समावेश होतो. महसुली खर्चात सातत्याने वाढ होत आहे. महसुली खर्चात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनावर सर्वाधिक खर्च होतो. त्याव्यतिरिक्त वीज, पाणी, वाहने, सरकारी कर व अन्य पायाभूत या बाबींचा समावेश होतो. वाढत्या खर्चामुळे रिक्त […]